मोठी बातमी : "धडक इशारा: PMRDA च्या ताब्यात गेल्या जमिनी; आता तुमची 'गायरान' घरे कधीही उद्ध्वस्त होणार! वेळीच जागे व्हा, अन्यथा संसार उघड्यावर येणार!"
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड(पुणे) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) अत्यंत धडाकेबाज पद्धतीने आपल्या हद्दीतील जमिनी हस्तांतरित करून, खेड तालुक्यातील महाळुंगे, खराबवाडी, निघोजे आणि चऱ्होली या गावांसह परिसरातील गायरान जमिनींवर ताबा मिळवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष आदेशानुसार महसूल रेकॉर्डवर आता थेट PMRDA चे नाव झळकले आहे. मात्र, जमिनींचे हस्तांतरण होऊनही अजूनही काही नागरिक 'सगळं काही ठीक होईल' या भ्रमात राहून गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आहेत. ही बेसावधगिरी नागरिकांच्या अंगलट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
लवकरच होणार धडक कारवाई..
ज्या गायरान क्षेत्रावर नागरिक पिढ्यानपिढ्या राहत आहेत किंवा ज्या जागेवर मोठ्या दिमाखात व्यवसाय थाटले आहेत, ती जमीन आता पूर्णपणे PMRDA च्या कायदेशीर मालकीची झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जमिनींचा वापर आता विविध सामाजिक आणि पायाभूत विकासात्मक प्रकल्पांसाठी प्राधान्याने केला जाणार आहे. त्यामुळे, प्राधिकरणाकडून कोणत्याही क्षणी या गायरान क्षेत्रावरील अतिक्रमणांवर 'बुलडोझर' चालवून धडक कारवाई केली जाऊ शकते.
संसार रस्त्यावर येण्याची वेळ?
प्रशासनाने जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे, आता पुढचे पाऊल हे अतिक्रमण हटाव मोहिमेचे असेल. जे नागरिक आताही आपली बांधकामे अधिकृत होतील, या आशेवर बसले आहेत, त्यांना हे वास्तव समजून घेणे गरजेचे आहे की, आता कायदेशीर पळवाटा उरलेल्या नाहीत. जर वेळीच आपली पर्यायी राहण्याची किंवा व्यवसायाची व्यवस्था केली नाही, तर कारवाईच्या दिवशी सर्व सामान रस्त्यावर येईल आणि संसार उघड्यावर आल्याशिवाय राहणार नाही.
नागरिकांना निर्वाणीचा इशारा..?
जमिनी हस्तांतरित होताना जसे नागरिक बेसावध राहिले, तशी चूक पुन्हा करून चालणार नाही. प्रशासनाची यंत्रणा आता अत्यंत आक्रमक झाली आहे. आज जर गांभीर्य ओळखले नाही, तर उद्या पश्चाताप करण्याची वेळ येईल. त्यामुळे या क्षेत्रातील रहिवाशांनी आणि व्यावसायिकांनी आता 'आपली जागा ही आपली नाही' हे कटू वास्तव स्वीकारून तातडीने पर्यायी जागेचा शोध घ्यावा.
प्राधिकरणाच्या कारवाईत घर आणि व्यवसाय दोन्ही एका झटक्यात नष्ट होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही क्षणभराच्या विलंबामुळे होणारा मनस्ताप टाळण्यासाठी, आता नागरिकांनी डोळे उघडून तातडीने हालचाली करणे, हेच त्यांच्या हिताचे ठरेल. अन्यथा, नियती कुणाचीही वाट पाहणार नाही आणि तुमच्याच चुकीच्या आशेमुळे तुमचे हक्काचे छप्पर काळाच्या ओघात जमीनदोस्त होईल, यात शंका नाही!
What's Your Reaction?
Like
2
Dislike
1
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
2
Wow
0