मोठी बातमी : कंपनीची भिंत अंगावर कोसळून मजूर दाम्पत्याचा मृत्यू; तळवडे येथील धक्कादायक घटना..!

ठेकेदाराकडून कामगारांची सुरक्षा रामभरोसे..

Mar 14, 2026 - 09:42
 0
मोठी बातमी : कंपनीची भिंत अंगावर कोसळून मजूर दाम्पत्याचा मृत्यू; तळवडे येथील धक्कादायक घटना..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

​चिखली (पुणे): औद्योगिक क्षेत्राला लागून असलेल्या तळवडे येथील ज्योतिबानगर परिसरात शुक्रवारी (दि. १३) एक भीषण दुर्घटना घडली. एका कंपनीच्या संरक्षक भिंतीचे (वॉल कंपाऊंड) बांधकाम सुरू असताना अचानक भिंत कोसळल्याने कामावर असलेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी एक कामगार जखमी झाला आहे.

नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, तळवडे येथील जागा मालक सदाशिव आगळे यांनी त्यांच्या इंडक्शन थर्मल कंपनीच्या खुल्या भूखंडाला विटांचे वॉल कंपाऊंड बांधण्याचे कंत्राट दीपक जाधव (रा. चाकण) यांना दिले होते. या कामासाठी जाधव यांनी चाकण येथील लेबर नाक्यावरून मजूर आणले होते.

शुक्रवारी(दि. १३) सायंकाळी ४:३० च्या सुमारास भिंतीचे बांधकाम सुरू असताना अचानक संपूर्ण बांधकाम मजुरांच्या अंगावर कोसळले. यामध्ये खालील मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले:

• ​मृत: सचिन शंकर राठोड (वय ३०) आणि कोमल सचिन राठोड (वय २५) – मूळ गाव: लोहा, जि. नांदेड. सध्या राहणार: मेदनकरवाडी, चाकण.

• ​जखमी: मनोहर भिकू चव्हाण (वय ३८) – राहणार: गाडगे आळी, चाकण.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

​भिंत कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या राठोड दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर मनोहर चव्हाण यांच्यावर देहूगाव येथील इम्पेरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

​या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, 'बांधकाम ठिकाणी मजुरांच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या का?' असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. पोलीस याप्रकरणी कंत्राटदार आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी