मोठी बातमी : कॅप्टन अशोक खरात यांच्याशी असलेल्या कथित स्नेहामुळे महिला आयोग अध्यक्षांचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ..!
लोकन्याय मराठी विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे. पत्रात त्यांनी राजीनाम्यासाठी 'वैयक्तिक कारण' पुढे केले असले तरी, नाशिकमधील एका गंभीर प्रकरणामुळे त्यांना ही नामुष्की स्वीकारावी लागल्याची चर्चा आता रंगली आहे.
नेमकं प्रकरण काय?
नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात यांच्यावर महिलांचे शोषण केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे कॅप्टन अशोक खरात यांच्याशी असलेले स्नेहाचे संबंध आता चर्चेचा विषय ठरले आहेत.

वाढत्या दबावामुळे नामुष्कीने घेतला निर्णय..
कॅप्टन अशोक खरात यांच्यासारख्या वादग्रस्त व्यक्तीशी असलेल्या निकटतेमुळे चाकणकर यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली होती. महिलांचे शोषण करणाऱ्या व्यक्तीला अभय मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी लावून धरला होता. यामुळे निर्माण झालेली नामुष्की टाळण्यासाठी अखेर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, असे बोलले जात आहे.
राजीनामा पत्रातील मुख्य मुद्दे:
रुपाली चाकणकर यांनी पत्रात नमूद केले आहे की:
• त्यांची नियुक्ती १५ ऑक्टोबर २०२४ रोजी झाली होती.
• वैयक्तिक कारणाने त्या स्वेच्छेने या पदाचा राजीनामा देत आहेत.
• हा राजीनामा त्वरित स्वीकारावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या या राजीनाम्यामुळे आता नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
1
Love
0
Funny
0
Angry
1
Sad
0
Wow
2