राजकीय : नानेकरवाडी-महाळूंगे गटात गणेश बोत्रेंचा झंझावात; खराबवाडीतील 'चाणक्य' नितीकार सपशेल अपयशी.. !

Feb 10, 2026 - 00:56
Feb 10, 2026 - 00:58
 0
राजकीय : नानेकरवाडी-महाळूंगे गटात गणेश बोत्रेंचा झंझावात; खराबवाडीतील 'चाणक्य' नितीकार सपशेल अपयशी.. !

लोकन्याय मराठी प्रतिनिधी - आशिष ढगे पाटील

चाकण : नानेकरवाडी-महाळूंगे जिल्हा परिषद गटाच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत गणेश बोत्रे यांनी 'मशाल' चिन्हाचे उमेदवार जीवन खराबी यांचा पराभव करत दणदणीत विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत गणेश बोत्रे यांच्या 'मायक्रो' नियोजनापुढे खराबवाडीतील स्वयंघोषित राजकीय चाणक्यांची रणनीती सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

त्रिकोणी लढतीत बोत्रेंची सरशी.. 
सुरुवातीला चौरंगी वाटणारी ही निवडणूक भाजप नेते संदीप सोमवंशी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्रिकोणी झाली. 'घड्याळ' चिन्हावर गणेश बोत्रे, 'मशाल' चिन्हावर जीवन खराबी आणि 'धनुष्यबाण' चिन्हावर गणेश नानेकर यांच्यात थेट लढत झाली. मात्र, खराबवाडीतील काही रणनीतीकारांनी निवडणुकीचे नियोजन स्वतःच्या ताब्यात घेऊन जीवन खराबी यांनाच अंधारात ठेवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

'नियोजन' ठरले विजयाचे गमक.. 
गणेश बोत्रे यांनी विरोधकांच्या कच्च्या दुव्यांचा अचूक शोध घेतला. त्यांनी केवळ एका गावावर लक्ष केंद्रित न करता सर्व गावांत 'मायक्रो मॅनेजमेंट'वर भर दिला. दुसरीकडे, खराबवाडीतील चाणक्यांनी केवळ स्वतःच्या गावातून मतदान वाढवण्यावर भर दिला आणि बाहेरील गावांकडे दुर्लक्ष केले. याच ढिसाळ नियोजनाचा फायदा बोत्रे यांनी उचलला.

दिग्गज नेत्यांची साथ आणि ऐनवेळची समीकरणे..

निवडणुकीच्या रणधुमाळीत गणेश बोत्रे यांनी अत्यंत चाणाक्षपणे राजकीय खेळी खेळल्या:

संदीप सोमवंशी यांची साथ: अर्ज मागे घेतल्यानंतर बोत्रे यांनी तातडीने सोमवंशी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या बाजूने वळवले.

संभाजीराजे खराबी यांची 'एन्ट्री': राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संभाजीराजे खराबी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन बोत्रे यांना पाठिंबा जाहीर केला. हीच घटना जीवन खराबी यांच्या पराभवाची मुख्य ठिणगी ठरली.

एकजूट फळी: संतोष खराबी, राहुल शेलार आणि इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी थेट मैदानात उतरून बोत्रेंचे काम केले, ज्यामुळे खराबवाडी गावातच जीवन खराबी यांच्या विरोधात एक मोठी फळी निर्माण झाली.

पराभवाचे आत्मचिंतन गरजेचे.. 
जीवन खराबी यांनी उमेदवार म्हणून आपली १०० टक्के ताकद लावली, मात्र त्यांच्या यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे त्यांना पराभवाचा धक्का बसला. राजकारणात केवळ 'चाणक्य' बनून चालत नाही, तर प्रत्यक्ष जमिनीवरची समीकरणे आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी महत्त्वाची असते, हेच या निकालाने स्पष्ट केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 1
Love Love 0
Funny Funny 3
Angry Angry 0
Sad Sad 1
Wow Wow 1
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी